Sunday, November 30, 2008

पुन्हा एकदा एस टी आणि अर्थातच पुणे

मी आणि माझा भाऊ असेच काही कामानिमित्त मुंबईला चाललो होतो.... वोल्वोचे आरक्षण मिळाले होते.... त्या मुळे आम्ही दोघेही खुश होतो... नेहेमी वोल्वोने नाही जात... त्या मुळे अजुन टिपिकल वोल्वोचे चे प्रवासी झालो नव्हतो.... आलिप्त वगैरे रहाणे आम्हाला जमत नव्हते आणि अजुनही जमत नाही.... विशेष करून जर बाजुला काही interesting प्रसंग चालु असेल तर.....


गाड़ी नेहेमीप्रमाणे उशिरा आली.... तसा फार काही उशीर नव्हता झाला ... २८ मिनिट फ़क्त... एका प्रवाशाने केली तेवढ्यात सुरुवात.....


प्रवासी : साहेब गाड़ी अर्धा तास लेट झाली की हो....

साहेब : गाड़ी २८ मिनिट लेट आहे... ३० नाही..... (साहेबानी विकेट काढली...)

प्रवासी : साहेब २ मिनिट म्हणजे काही जास्त नाही (गुगली टाकायचा प्रयत्न ) ....

साहेब : अहो, २ मिलीसेकंद मधे सुवर्ण पदक जाते.... २ मिनिट काहीच नाही कसे म्हणता ... (सिक्स़र) ....

प्रवासी जरा बावरला, काय करणार पुण्याचा नव्हता....

साहेब : (सांत्वनास्पद भाषेत ) अहो साहेब , जरा मजेत बोललो, एवढे काय मनाला लाउन घेता... येइल हो गाड़ी २ मिनिटात ... जरा कुठे ट्रैफिक मधे अडकली असेल...


साहेबाना बहुतेक कोणी तरी कानात भविष्य सांगितले असावे... कारण खरोखर गाड़ी २ मिनिटात आली... आपले शब्द खरे झाल्याचे पाहून साहेबसुद्धा दचकले... आपले शब्द खरे करण्यासाठी जणू कंडक्टर साहेबानी गाड़ी वेळेवर आणली असे वाटुन त्याना ज़रा गहिवरून आले...


तेवढ्यात कंडक्टर साहेबानी आरोळी दिली " फ़क्त reservation वाल्यानी बसा.... गाड़ी फुल हाय...."

त्या आरोळीला समोरून दाद आली.... " Reservation आहे म्हणुन तर थांबलो नाहीतर गेलो असतो निघून..... २९.३० मिनिट झाले ..... बरोबर का कंट्रोलर साहेब "

कंट्रोलर साहेबानी काचेतुनच मान डोलावली... टोमणा समजला होता... पण आता हां भिडू जाणार आहे, उगाच कशाला डिवचा म्हणुन कंट्रोलर साहेब गप्प बसले...


आता खरेतर सर्वच जण reservation वाले होते .... तरी पण मी आणि भाऊ पळत आत घुसलो... कारण एकच.... विण्डो सीट.... पण भाऊ जरा जास्तच धडधाकट असल्याने त्याने "साम, दाम आणि भेद" ह्यांचा वापर न करता "दंडाचा" वापर करून विण्डो सीट काबिज केली.... आता वोल्वो असल्याने २ X २ सीट्स होत्या.... विण्डो मधे भाऊ , बाजुला मी.... माझ्या बाजुला म्हणजे पलिकडच्या साइडला एक तरुण (उतार वयातील) मुलगा आणि त्याच्या बाजुला एक तरुण, सुंदर मुलगी बसली होती.... (हां पलिकडच्या सीट वरचा क्रम बदलून जरा लालित्य साधायचा विचार मनात आला होता... पण आपण लालित्या पेक्षा सच्चाई ला जास्त मानतो.... असो )... तो मुलगा स्टैंड वर असल्या पासून प्रार्थना करत असावा अशी सीट मिळावी म्हणुन... कारण तो स्टैंड वर सारखा त्या मुलीवर आणि तिच्या बरोबर आलेल्या मुलावर लक्ष ठेउन होता... त्या मुलीबरोबरच्या मुलाने जेव्हा बस लेट झाली म्हणुन कंट्रोलर साहेबांशी हुज्जत घातली तेव्हा पण तो लक्ष देऊन ऐकत होता....



गाड़ी सुटली... मी पण गेलेल्या विण्डो सीटचे दुःख न करता ( दुःख करून पण काही मिळणार नव्हते , कारण सर्व खाद्य पदार्थ भावाकडे होते) , भावाशी परत हातमिळवणी केली... आम्ही दोघे त्या (उतार वयातील) तरुणाची मजा एस टी स्टैंड पासून बघत होतो... ती continue केली... त्या मुलाने पण धीर करून बोलायला सुरुवात केली.... नाव वगैरे विचारले आणि खड़े टाकायला सुरुवात केली


तरुण : तुम्ही काय करता???? ( पहिला खड़ा टाकुन पाहू...)

मुलगी : मी एक कंपनीमधे सॉफ्टवेर डेवलपर आहे... (त्या मुलीने कुठले तरी अगम्य नाव सांगितले... स्पष्टपणे कटवत होती त्या मुलाला)

तरुण : अच्छा अच्छा .... मग कुठल्या टेक्नोलॉजीवर काम करता आपण???

मुलगी : (तुला काय करायचे आहे...) तसे काही नाही... मी जनरली जावा आणि C# वर काम करते...

तरुण : अरे वा वा ..... पण मध्ये काहीतरी जावाला डिमांड कमी झाली असे ऐकले होते... तसा माझा आणि कंप्यूटर चा विशेष संबंध नाहीये ... फ़क्त मेल्स वगैरे चेक करतो... तेवढाच...

(कंप्यूटर तसे नविन आहेत.... आपल्या वयाच्या दृष्टीने... इति माझा भाऊ => मला )

मुलगी : नाही हो.... स्किलसेट असला की काही प्रॉब्लम नाही येत.... आणि आता मला चांगला एक्स्पीरिएंस पण आहे... त्यामुळे काही स्लो डाउन आले तरी आम्ही बरेच सेफ असतो.... नविन किंवा अनस्किल्ड लोकांना प्रॉब्लम येऊ शकतो...

तरुण : (एकदम टोमणा समजल्याने विषयांतरासाठी ) हां, ते तर झालेच ... अच्छा एक सांगा .... तुमच्या बरोबर जो मुलगा आलेला, फार चिडलेला दिसत होता हो.... तुम्हाला ते कंट्रोलर काही बोलले का???

मुलगी : छे छे... अहो गाड़ी लेट झाली म्हणुन तो वैतागला होता....

तरुण : काय गाड़ी लेट होणे विचित्रपणा आहे... आपल्याकड़े वेळेचे महत्व नाहिये लोकाना .... तसा मी नेहेमी स्वतःच्या वेहिकल ने जातो... Alto AC ने.... पण आजच काय सुचले आणि ह्या वोल्वो ने जाऊ म्हटले.... आणि नेमकी गाड़ी लेट....

(इम्प्रेशन मारण्याचा केविलवाणा प्रयत्न... मी => माझ्या भावाला)

मुलगी : अरे अरे .... (मनातल्या मनात... मनहूस... म्हणुन गाड़ी लेट झाली तर...)

(तेवढ्यात मागच्या आजींची कुजबुज ऐकू आली... "अवलक्षणी कार्टा आहे.... कधी नाही ते आला आणि गाड़ी लेट केली ...." )

तरुण : बर ते जाऊ दे .... चिडणार नसाल तर विचारतो ... कोण होता हो तो मुलगा??

(इकडे त्या मुलीच्या चेहर्यावर त्रस्त भाव स्पष्ट दिसू लागले होते...)

मुलगी : तो माझा fiance आहे... का हो??? तुम्ही ओळखता का त्याला???

तरुण : छे छे ..... तस नाही... एकदम "Angry Young Man" दिसतो... हेहेहे

(उगीचच बत्तिशी दाखवण्याचा प्रकार)

मुलगी : (काय ताप आहे डोक्याला, असा चेहरा करून) अहो आम्ही बसून बसून कंटाळलो होतो... तो म्हटला चल जरा पुण्यातल्या लोकांची मजा दाखवतो... म्हणुन मग जरा बोलला जाउन आणि उत्तरे ऐकली आम्ही..

तरुण : ओह्ह ... म्हणजे एकदम इम्प्रेशन मारायचा प्रयत्न म्हणा ना..

(आणि तुम्ही करताय ते काय काका. ..इति मी => माझा भाऊ.....)

मुलगी : नाही नाही, त्याला त्याची गरज नाही..... त्याने मला आधीच इम्प्रेस केले आहे...... नविन काही करायची गरज नाही...

तरुण : (ओशाळुन जाउन) नाही नाही... तुम्ही गैरसमज नका करून घेऊ... मी सहज म्हटलो... बाय द वे काय करतो हो तो????

(कुठे तरी इम्प्रेशन मारता येते का??? ह्याची चाचपणी सुरु आहे.....इति माझा भाऊ => मला )

मुलगी : (हां काय गप बसत नाही.....) तो एक MNC मधे आहे... खुप चांगल्या कंपनी मधे आहे तो.... एकदम यंग असतानाच चांगली संधि मिळाली आहे

( मुलगी पुण्याची नसली, तरी टोमणा चांगला मारते ... परत माझा भाऊ => मला ,

मग सासर पुण्याचे असणार आहे ना..... इति मी => माझ्या भावाला)

तरुण : हे हे... वा वा .... मी पण अशाच एका MNC मधे आहे.... मलाही अशीच संधि मिळाली होती... (तेवढ्यात बाजुला त्याच्या कंपनी ची बिल्डिंग आली असे त्याने सांगितले, खरे खोटे देव जाणे)

तरुण : ते पहा माझे ऑफिस... खुप धमाल करतो आम्ही इकडे ...

(कुणी विचारले आहे का???..... इति माझा भाऊ => मला)

मुलगी : ( फ़ोन वर खेळत खेळत) वा वा (उपरोधात्मक स्वरात)...... काय मज्जा आहे ना....

तरुण : (काही झाले तरी हार नाही मानायाची) तुम्ही पुण्याच्याच का??

मुलगी : नाही... (संभाषण कामितकमी शब्दात सम्पवायची इच्छा स्पष्ट करीत)

तरुण : अच्छा , मग मुंबईच्या वाटत...

मुलगी : आता गाड़ी तर मुंबईलाच जाते ना.... तुम्ही पुण्याचे वाटत...

तरुण : नाही हो... मी पण मुंबईचा आहे ... पण गेली बरीच वर्ष पुण्यात असतो...

(ते दिसते आहे काका... बरीच वर्ष आणि पुण्यात वास्तव्य दोन्ही गोष्टी सिद्ध होत आहेत... इति माझा भाऊ => मला )

तरुण : मी कांदिवलीला राहतो , तुम्ही???

मुलगी : मी बोरीवलीला.... excuse me .... ज़रा फ़ोन येत आहे मला...

(ती मुलगी शुअर बोरीवलीला रहात नाही इति मी => भावाला)


मग ती मुलगी पुढचे २ तास फ़ोनचे handsfree कानाला लाउन होती... जरा वेळाने त्या तरुणाने त्या मुलीचे लक्ष वेधण्याचे अनेक (असफल) प्रयत्न केले.... मग ती नाही लक्ष देत बघून त्याने आपला मोर्चा मागच्या २ आजींकडे वळवला.... त्या आजींचे कुठल्या स्टाप वर उतरायचे ह्यावर एकमत होत नव्हते.... तिकडे ह्याने आपले मत मांडण्यास सुरुवात केली......


आजी १ : मला चकाल्याला जायचे आहे... कुठे उतरणे बरे पडेल हो??

आजी २ : मला काही विशेष कल्पना नाही... पण पार्ल्याला उतरणे सोपे पडेल...मी ५-७ वर्षानी येत आहे मुंबईला.... त्यामुळे काही लक्षात नाही....

तरुण : sorry आजी.... मी तुमचे बोलणे ऐकले... ऐकायला नको होते..... पण मला असे वाटते की तुम्ही जोगेश्वरीला उतरून गेलात तर सोईचे पडेल....

आजी १ : (मनातल्या मनात ... मेला, आजी म्हणतो... तुझ्या आईच्या वयाची मी.... त्यात चोरून बोलणे ऐकतो आणि वर निर्लज्जपणे सांगतो .....ती मुलगी कंटाळली ... आता आम्हाला कशाला छळतोस...) अरे ठीक आहे ... आम्ही कंडक्तर ला विचारू...उगीच तुला त्रास नको...

(१ ल्या आजी कंडक्तरला विचारायला गेल्या)

आजी २ : अरे पण जोगेश्वरी फार पुढे येते रे..... मी ७ वर्षांपूर्वी आले होते.... फार लांब होइल रे जोगेश्वरी...

तरुण : आजी , मी मुंबईमधे लहानाचा मोठा झालो आहे... मला नीट माहीत आहे हां पूर्ण एरिया....

मुलगी : आजी, चकाल्याला जायचे असेल तर अंधेरी ला उतरा.... ते सोयीचे पडेल..... रिक्शा पण मिळेल लगेच...

आजी १ : हो हो... कंडक्तरपण तेच म्हणाला ... अंधेरीहुन रिक्शा पण मिळते...

तरुण : (चेहरा पाडून) मी बरीच वर्षे तसा मुंबईला नाही राहिलो...त्यामुळे जरा विसरायला झाले आहे...


हे ऐकायच्या आधी परत मुलगी फ़ोन मधे बिजी झाली.... लगेचच आजींचा पण फ़ोन वाजला आणि अचानक दोन्ही आजी पण फोन वर बिजी झाल्या.... .... त्याने माझ्याकडे पाहिले... पण त्याने बहुधा माझे आणि भावाचे संभाषण ऐकले असावे... कारण मी दिलेल्या स्मितहास्यानंतरसुद्धा त्याने आमच्याकडे कुत्सित नजराने पाहून मान टीवी कड़े वळवली... आणि अचानक त्याला सुद्धा कुणाचा तरी फ़ोन आला.... आणि पुढचा अर्धा तास तो फ़ोन वर बिजी झाला...


(समाप्त)


वि सु . : लेख पूर्णपणे सत्य घटनेवर आधारित ... ...लेखक आणि त्याचा भाऊ ह्या सत्य घटनेचे "प्रत्यक्षदर्शी साक्षीदार (आय विटनेस)" ...


लेखक : गुरुप्रसाद आफळे






Friday, November 28, 2008

Chaos

As we salute our brave and patriotic martyrs, still the bigger question remains to be answered...

What is our government going to do to prevent such incidents in future???

Government provides financial aid as well as employment to people or their relatives who suffer in bomb-blasts... what about families of these martyrs???? Government provides help to people who were injured in political clashes... What about policemen who are either injured or dead??? Government should answer these questions.... It should not happen that these people are remembered only on a particular day and on remaining days; we don't even remember them....

As I am writing this, some news channels claiming to be the fastest and the best, are giving following breaking news...
"India tour of England abandoned"
"ICL teams were going to stay in Taj… Concerns over their safety"
"Champions league khatare mein (Champions League's schedule in danger)"

This shows the concern these media people or so called fourth corner stone of democracy have towards the situation. They should do a self-inspection before demanding press freedom. I mean, they are not at all matured. They update "us" on police position outside the building… Are they not updating terrorists and alerting them??? Come on guys, show some common sense and maturity… Where are so-called human rights activists??? Can't they see clear violation of human rights in terrorists' activities??..… Actually these human rights people only blame Indian government because they know that this government is going to make them famous. Other governments just ignore them... They don't have guts to raise their voice against countries where human rights concept is itself a joke... These news channels should call themselves entertainment channels instead. I am using very mild language here… But I think everyone is feeling the same….

Are some politicians going to provide financial and legal aid to "the accused" terrorists and condemn the police action against them...???? When are our politicians going to stop exploiting everything for political benefit?? Why are our politicians not supporting our forces??? Are they not demoralizing our forces?? Soldiers laid down their lives for protecting these politicians during parliament attack…and now these politicians are supporting the person who was involved in the same attack… Would these politicians respond in same manner, if instead of soldiers, one of their colleagues "a fellow politician" had died in the attack??? I think then the terrorists would have been encountered, instead of court trials and human rights issues…

It's already too late... But we should start seriously thinking about these questions... Generally, we just get angry, exchange some heated arguments and forget after 2-3 days…But if we don't act now, we may not get another chance… They have proven that they can get into high security zones like parliament with ease and kill anyone of us… We need to unite and fight this situation... First and most important thing we can do is pressurize our politicians…Pressure of votes… That's a thing that can make our politicians do anything… They will do anything for votes…. Exploit this… Tell them bluntly that you won't vote for them if they take up cause of any person involved in terrorist activities or any other illegal work... We should ask our politicians this question during upcoming elections and demand an explanation... …. If the politician is not able to provide any answer, don't vote for him/her...
Wake up to the situation… I think this is the time when we still have a hope… Otherwise we may not be present to think of a solution to such situation…

Tuesday, November 25, 2008

अस्सल पुणेरी

एस टी स्टैंड म्हणजे एक "अलौकिक" जागा आहे .... सर्व प्रकारचे लोक बघायला मिळतात .... जत्रेला जाणार्यान्पासुन ते "International Festival" ला जाणार्यापर्यंत ... बारश्यापासून ते १३ व्या पर्यंत जाणारे लोक... लाल डब्याने जाणार्यान्पासुन ते "AC Volvo" ने जाणार्यापर्यंत..... अगदी सर्व तर्हेची माणसे दिसतात ..... त्यांच्या हाव भावांमुळे ( किंवा अभावामुळे ) सहज ओळखु पण येतात .... उदा . लाल डब्याने जाणारी माणसे एकदम बिनधास्तपणे बोलत असतात ... बाजुच्याची विशेष माहिती नसतां सुद्धा त्याच्याशी निवांत बोलायला सुरुवात करतात... हयात जर चुकून एखादा/दी volvo वाला आला तर त्याला ओळखणे एकदम सोपे ... फ़ोन वर बोलताना किंवा आजू बाजुश्याशी बोलताना (चुकुनच असे होते) तो / ती कमीत कमी वेळा तरी " volvo" मिळाली नाही म्हणुन हां ताप आहे" असे ऐकवत असतो/ते.... volvo ने जाणारी माणसे मात्र चेहर्या वर अतिशय गंभीर भाव आणून वावरत असतात... चुकून सुद्धा हसत नाहीत ... सारखे फ़ोन कानाला लावून असतात ... वडा पाव , समोसे वगैरे घेता "burger, chips " घेतात .... पाणी पण "bisleri" वगैरे घेतात... फ़ोन वरुन बोलताना सुद्धा उगाचच आपण किती मोठ्या पदावर आहोत किंवा किती मोठ्या कंपनी मधे आहोत हेच ऐकवत असतात... आणि ह्या दोन्ही च्या मध्ये "Asiad" ने जाणारी माणसे .... त्याना शेजाराच्याशी बोलायाचे पण असते..... पण ओळख नसताना कसे बोलायाचे.... म्हणुन मग एकटेच बसतात ... ह्याना फ़ोन वर बोलायाचे सुचते ... फ़ोन पण करतात ... पण समोरची व्यक्ति नेमकी बिजी असते..... मग कधी कर्मधर्मसंयोगाने पेपर वाला जवळ आला तर पेपर घेउन वाचत बसतात..... पण गाड़ी सुरु झाली की ते पण नको होते... आणि मग एकटेच कंटाळतात

अश्या ह्या सर्व समावेशक एस टी स्टैंड वर अनेक विसंवादी पात्रे असतात ... त्यांच्यातील संवाद अतिशय विनोदी बनू शकतात ... त्यातून जर गाड़ी लेट झाली असेल आणि कंट्रोलर प्रवासी, दोन्ही पार्ट्या "खाष्ट पुणेरी " असतील तर मग विचारायलाच नको...

वेळ : कुठलीही (बस येण्याची )

ठिकाण : स्वारगेट बस स्थानक

नेहेमी प्रमाणे बस येण्यास उशीर होऊ लागला होता. तसा काही फार उशीर नव्हता झाला...एस. टी. महामंडळाच्या (अलिखित) नियमाप्रमाणे १५-२० मिनिट इकडे तिकडे होणारच (पण कधीच गाड़ी "इकडे" होत नाही कायम "तिकडेच" का होते?? हे कधीही सुटलेले कोड आहे). शेवटी त्यानाही काही मर्यादा आहेतच...काही ठिकाणी त्यांचा सुद्धा अगदीच "णाइलाज" (एस टी महामंडळाचा " पेशल" उच्चार) ( No offenses meant :P ) होतो. काय करणार ?? कधी कधी गाड़ी "ट्रोफिक" मधे अडकते... डिझेल वाले लोक रुसून बसतात , वाहक ऐन वेळी गायब होतात , वाहक आहे तर चालक नाही , चालक आहे तर वाहक नाही , दोघे आहेत तर गाड़ी नाही , गाड़ी, चालक आणि वाहक - तिघेही आहेत पण डिझेल वाला नाही ... अनंत अडचणी असतात... पण कसलेही टेंशन घेता तिथले कंट्रोलर साहेब सर्व प्रकारच्या " पब्लिक" ला तोंड देत होते आणि स्वारगेट असल्या मुळे दणदणीत उत्तरे देऊन एखाद्याला "तोंडघशी" पण पाडत होते ... असेच काही बस लेट होण्याच्या वेळचे प्रेमळ संवाद ... स्वतः ऐकलेले ...... आणि ऐकवलेले ही

"स्वछता" मोहिम चालु असल्याने प्रचंड धुळ उड़त होती... पावसाळ्याचे दिवस आणि ३६ तासात मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेकडून वर्तवली गेली असल्याने सर्व प्रवाशी निश्चिंत होते ... कारण ही त्यांची आणि वेधशाळेची सांकेतिक भाषा होती ..... म्हणजे अधिकृत रित्या नव्हती ... पण "३६ तासात मुसळधार पावसाची शक्यता आणि पुढचे दिवस temperature ३६ डिग्री सेल्सियस" असे काही विलक्षण पूर्वानुभव गाठीशी ..... पण कधी कधी स्वप्नामधे पाहिलेले खरे होते म्हणतात तसाच काहीसा अनुभव आला आणि अचानक खरोखरच्या मुसळधार पावसाला सुरुवात झाली... पावसाचा फायदा म्हणजे धुळ उडायची बंद झाली... .पण जे लोक बाहर थांबले होते ते पण आत आडोश्याखाली आले त्यामुळे गर्दी तेवढीच राहून पण जास्त वाटु लागली
प्रवासी वैतागलेले होते ..ते अजुन वैतागले ...... कंट्रोलर साहेब पण जरा चिडलेले दिसत होते.... कारण गाड़ी उशिरा येण्याचे कारण "मानवी स्वभावातील गुण दोष " (राग लोभ शी ) निगडित होते .... बराच वेळ झाला ... अजुन काही डिझेल वाले आणि वाहक यांच्यातील सं"वाद" संपला नसेल ह्या अपेक्षेत कंट्रोलर साहेब ... ... ... पण समोरच्या पब्लिक ला तसे काही जाणवून देता ते शक्य तेवढ्या शांतपणे उत्तरे देत होते.... त्यातल्या त्यात रिलीफ़ म्हणजे एसी गाड़ी लेट झाली होती.. पब्लिक तसे शांत होते... उगीच कुणी आवाज वाढवून बोलत नव्हते ... फार तर फार तक्रार करायची धमकी होते ... पण .. ..१५ - २० मिनिटे करून करून तास, मग .३० तास आणि शेवटी तास झाले आणि हळु हळु प्रवाश्यांच्या सहनशक्तीचा बांध फुटला ...

प्रवासी १ : साहेब , गाड़ी कधी येणार ??? १५ -२० मिनिट करता करता १२० मिनिट झाले .....
साहेब : अहो काका, गाड़ी अडकली असेल " ट्रोफिक " मधे ... (बाजुच्या तरुण मुला कड़े बघून ) आता तुम्हाला पण माहिती आहे ना राव पुण्यात ट्राफिक ( इकडे बरोब्बर उच्चार ) कसे असते त्यात रस्ते बेकार वगैरे वगैरे ...
तरुण मुलगा (कुणीतरी मत विचारले म्हणुन एकदम खुश होउन) : नाहीतर काय हो काका... अगदी शिस्त म्हणुन नाही लोकाना .... अरे नियम जरा म्हणुन पाळायाचे नाहित.... अशाने रस्त्यात Traffic Jam होणार नाही तर काय होइल... ( इकडे त्याचा पत्ता लक्षात येतो )
प्रवासी २ : पण साहेब , हे रोजचेच झाले आहे.... extra गाड़ी सोडा ना...
सा. : साहेब अजुन किती गाड्या सोडणार आम्ही तरी.... थोडा वेळ वाट पहा
त . मु . : वाट पाहून पाहून वाट लागेल आता.... ह्या पेक्षा प्राइवेट ने गेलो असतो तर बरे झाले असते...
तेवढ्यात तिकडून २ तरुण , धडाड़ीची वाटणारी मुले येतात .....
पहिला तरुण धडाड़ीचा मुलगा : काका, गाड़ी कधी पासून डेपो मधे उभी आहे... कधी काढणार ???
सा : काय सांगता .... गाड़ी डेपो मधे उभी आहे ???? अहो पण त्यानी आम्हाला रिपोर्टिंगच नाही केले अजुन .... तिकडे डेपोचे कंट्रोलर आहेत त्याना जाउन विचारा .... ("कसा टोलावला" ह्या विचारात साहेबांचे विजयी हास्य )
दुसरा तरुण धडाड़ीचा मुलगा : काका, चौकशी असे लिहिले आहे तुमच्या समोर .... आम्ही तुमच्याशी बोलणार नाही तर तुम्हाला दुसरे काम कसले?? तिकडेच जाउन विचारायचे आहे तर मग काउंटर बंद करा , तेवढाच एस टी महामंडळाचा फायदा तरी होइल...
सा : ( तोंड छोटे करून) अरे आम्ही तरी काय करणार.... ते लोक आम्हाला वेळेवर रिपोर्ट नाही करत... जरा समजुन घ्या ना ...
प . त . ध. मु . : ते तुम्ही काय ते बघून घ्या... गाड्या वेळेवर सोडा... मग आम्ही समजुन
घ्यायला काय , विचारायला पण येणार नाही....
पुण्यात आयुष्य गेलेल्या १ आजी : बाळा , चीड चीड नको करूस , त्याना काही फरक पडत नाही .... प . त . ध. मु . : फरक कसा पडत नाही... पडला पाहिजे .... एस टी काय घरची आहे का.... दु . त . ध. मु . : (उपरोधात्मक स्वरात) ओ साहेब , बाहेर या , तुम्हाला दाखवतो डेपो च्या कंट्रोलरला, कंडक्टरला कसे शोधायाचे आणि गाड़ी कशी डेपो मधून बाहर घेउन यायची ते ... या जरा काचेच्या बाहेर या....
( त्या २ त . ध . मु . ना असे बोलताना बघून इतर प्रवाशाना सुद्धा जोर चढला .... आणि काही इतर तरुण ( पण धडाडी नसलेले) आदरयुक्त कौतुकाने बघू लागले... २ तरुणांनीं तर त्या २ त . ध . मु . ना बसायला जागा सुद्धा देऊ केली... पण त्यानी ती अतिशय तुच्छतेने नाकारली .. दु . त . ध . मु . चे असे बोलणे ऐकून इतर प्रवासी त्याच्या मदतीला धावले... एकंदर रंग पाहून आणि दु . त . ध. मु . जरा जास्तच धडधाकट असल्याने कंट्रोलर साहेब जरा बिचकले....... )
सा : जातो... आणतो गाड़ी... नसेल तर नवी घेउन येतो विकत .... डोक्याला ताप झाला आहे रोजचा ....
धो धो पावसात लोक गरम का झाले ह्याचा विचार करत साहेब डेपो मध्ये गेले ....

( हां प्रेमळ सं"वाद" चालु असताना काही मुंबई चे लोक आपापसात ... "काय हो पुण्यात उत्तरे देतात .... मुंबई सारखे धड बोलत पण नाहित " , "ही काय बोलायची पद्धत झाली??? " इ इ असे बोलत होते )




... बराच वेळ झाला तरी दोघांचा पत्ता नाही.....तेवढ्या वेळात "काय गाडी बनवायला गेले आहेत की काय" असा एक उत्कृष्ट टोमणा त्या "मत विचारल्या गेलेल्या तरुण" मुलाकडून आला ... अखेर बऱ्याच वेळाने गाड़ी आणि साहेब दोघेही आले (साहेब गाड़ी मागुन चालत आले ... बहुधा ड्राईवर आणि साहेब ह्यांचाही प्रेमळ सं"वाद" झालेला दिसतो.... कारण ड्राईवरसाहेबानी तेवढ्यात काही वाईट शब्द वापरले ... xxxxx ).... साहेबानी गाड़ी आणल्या नंतर एकाच गलका होतो आणि सर्व लोक त्या गाडीत अक्षरशः घुसले आणि गाड़ी चालु झाली .... पुढे काय झाले ते (अर्थातच) त्या प्रवाशाना ठाउक...
(समाप्त)

वि सु . : लेख पूर्णपणे सत्य घटनेवर आधारित ... ... लेखक आणि त्याचा भाऊ ह्या सत्य घटने मधे "धडाडीनें" सहभागी ...

लेखक : गुरुप्रसाद आफळे
दिनांक : २५/११/२००८
कार्तिक कृ. १३, शके १९३०
मंगळवार