Monday, January 25, 2010

God @ 90 And Still Going Strong...

God scored 90th international century.... Another milestone achieved or should I say created???.. Yaa.. created would be a better word..... Many more to be created... Everytime he scores a run.. its a world record... Everytime he takes guard.. its a world record... The man... sorry *God*... himself looks like a mythological figure with so many miracles on his name...

It seems perfectly logical that God chose Sachin to prove his identity.. Cos, people believe in different Gods... At least they believe that each religion/cast/creed has different God.. So it was natural for God to choose a way where people from all casts/creeds/religions would praise him/appreciate him.. India is such a country that is home to all sorts of people... Cricket is one such religion that has no boundaries.. So it was a well calculated move by God to present himself as "Sachin Ramesh Tendulkar". Now, people can praise him without caring for religion and God does not have to prove his identity separately for each group among humans...

Some people try to criticize God... People who haven't even played 90 first class matches (let alone international matches) try to find flaws in God's technique.. People who have got his wicket (by the grace of some Great Umpires) try to boast of their achievements... Some people try to show themselves to be better batsmen by trying to score more runs.. But they forget the very basic fact.. They are mere mortals... they forget contribution of others in their success.. they had best bowlers in their side.. (and never actually faced the best bowling attack...), they succumbed to even the lowest of pressure (could not even shoulder expectations of few million people, let alone a billion plus people)... could not show same humbleness after scoring few runs... (afterall, genes play an important role in one's behavior)... were rarely a player who can carry entire team along with him.. others had 4 equally good batsmen to support them.. God, single-handedly carried entire team for more than 10 years.. There are people who switch off their tv when he is (given) out... And there are people who follow only Sachin after the match fixing scenario...

People who try each and everything to be called The Best Batsman... they forget that you can't *BEG* for the status.. you have to *EARN* that.. Try to carry burden of a billion people, try to face the best bowling attack in the world.. try not to depend on any single batsman in your team to score runs if you are (given) out.. try to be humble.. try to be a sportsman.. stop to claim fake catches.. stop to allege others racially, stop managing umpires.. just concentrate on your batting... you still have a lot to achieve..although you won't have that Aura or Grace or Perfection or Touch... in short you will never be GOD ... you *MORTAL*....

People (worshipers of GOD) say,
If cricket is a religion, Sachin is GOD...
that's not 100% correct....
Cricket may or may not be a religion...
GOD is SACHIN

Friday, January 1, 2010

मी आणि माझा शत्रुपक्ष : स्वघोषित साहित्यिक - एक पीड़ा

माझेही काही शत्रु आहेत... आता शिकारी लोक सापडणे फार दुर्मिळ झाले आहे (कारण शिकारीला प्राणीच उरलेनाहित... मुद्दलात शिकार नाही तर शिकारी कुठून येणार ...) आणि पाळिव प्राणी ह्या विषयावर बोलाल... तर .... हेहे.... मीच दुसर्या वर्गात मोडतो... माझ्याकडेच कुत्रा आणि मांजर हे दोन्हीही प्राणी आहेत.... (एकाच वेळी...) तसेट्रेनिंग च दिले आहे मी त्याना.... अगदी गुणी आहेत हो आमची मांजरे.... कधी चोरून दूध पिणार नाहित.... हां... आता कधी कधी त्यानी बाहेरून खेलायाला आणलेला उंदीर त्यांच्या तावडीतुन निसटतो आणि घरात थोडा गोंधळघालतो.... पण आता जीव म्हटले की चुका होणारच... आणि आमचा स्पाइक पण... स्पाइक म्हणजे आमचा कुत्रा... काय पण Labrador आहे... वा... असा अस्सल lab शोधून पण नाही सापडणार... केवढा हुशार आहे.... paper घेउन येणे... ball कैच करणे ह्या गोष्टी म्हणजे स्पाइक च्या अगदी डाव्या पायाचा मळ... अगदी परवाचीच गोष्ट... जाऊ दे... विषयांतर नको..... तर मतितार्थ हां की आमच्याकडचे सर्व प्राणी अगदी गुणी आहेत... आणि त्यामुलेमाझ्या शत्रुपक्षात थोड़े different लोक आहेत...

उदा.प्रवासात मोठमोठ्याने फ़ोन वर बोलणारे लोक... दादानो/ ताईनो तुमच्या कडे फ़ोन आहे ... माहीत आहेआम्हाला... का जाहिरात करता.... पुण्याच्या ट्राफिक सिग्नल वरील पोलिसमामा (आदर नितान्त आहे.... पणआदरयुक्त भीती पण आहे... माझा खिसा तर जाम भितो ह्याना... अनेकदा मला पकडले पण कधीच पावती नाहीफाडू दिली.... माझी इच्छा असुनही)...... राजकारण्याशी नाते सांगणारे लोक... (अरे तुला म्हणून सांगतो... अमुकअमुक साहेब आपल्या शब्दा बाहेर नाहित... आता आपल्याला ते वशिला लाउन काम करणे आवडत नाही.... नाहीतर काय अवघड आहे का आपल्याला तमुक तमुक गोष्ट करायला... साहेब तर नेहेमी आपल्याला म्हणतात... "
साहेब ( इथे 'ते' साहेब... ह्या 'साहेबाना' 'साहेब' म्हणतात... ), काय काम असेल तर नि:संकोच सांगा... तुम्ही एवढी जनतेची शेवा करता ... लोकांची कामे करता ..... आम्हाला तुमच्या शेवेची संधि द्या..."
पण आपण तत्वाने वागणारा माणूस.... आपल्याला नाही पटत.... म्हणून आपण मागे..... इ.इ.)

पण हे लोक तात्कालिक असतात... जोरदार पाउस जसा थोड़ा त्रास देतो... पण लगेच निघून जातो तसे... जास्तीतजास्त १-२ तास खातात महिन्यातून..... पण ह्या सर्वांपेक्षा चिवट आणि स्वसंतुष्ट एक जमात असते.... ती म्हणजे
स्वघोषित साहित्यिक


हे लोक लिहितात.... बर... नुसते लिहून थांबत नाहित.... लिहून ते ब्लॉग वर टाकतात.... बर ... ब्लॉग वर टाकुन स्वस्थ पडावे ना... नाही... आमच्या सारख्या निष्पाप जिवाना पकडून ते वाचायला लावतात.... नुसते वाचन नाही ... तर अभिप्राय द्या ... comments द्या... म्हणून जीव नकोसा करतात... आता कुणाला दुखवू नये म्हणून
"हेहे ... चांगला लिहिला आहेस...nice work.. keep it up...."
असे लिहिले तरी ह्यांचा जीव शांत होत नाही.... त्याना साहित्यीक अभिप्राय हवे असतात.... आणि नेमका अश्या लोकांच्या तावडीत मी नेहेमी जाऊन सापडतो... च्यायला.... मी एक software engg... माझा आणि साहित्याचा काही सम्बन्ध नाही... माझ्या दृष्टीने साहित्य म्हणजे मटेरिअल किंवा फार तर फार anything that can be used to perform some work.. आता ह्यांच्या लिखाणाने काय काम करता येइल???...... नाही म्हणायला एकदाफ़ायदा झाला होता... कसले तरी टेंशन होते.... झोपच येत नव्हती... रात्री कोणी बकरा ऑनलाइन आहे का म्हणूनशोधत होतो... तेवढ्यात मीच बकरा झालो... एका मित्राला .... त्यालाही निद्रानाश झाला होता... कविता सुचलीहोती... आता सुचली होती का फ्रेंच कविता सापडली होती आणि त्याने ती टेपली होती हा प्रश्न मला होता..... पण ४कड़वी वाचेपर्यंतच काय होत होते ते मला आठवते... नंतर दुसर्या दिवशी माझे मित्र मला उठवत होते...
"अरे... तब्येत बरी आहे ना... १४ तास काय झोपलास... deadline आहे ना तुझी .... .."
माझी शंका दूर झाली.... अशी कविता त्यालाच सुचू शकते.... पण लेकाचे आभार मानले मी..... त्याला बोललो... "तुझी कविता वाचून मला नविन शक्ति मिळाली.... एकदम फ्रेश झालो मी.... सर्व थकवा निघून गेला... " अजुन बराच चढवला होता मी त्याला... अगदी परवा पर्यंत तो मला साहित्यातील दर्दी , कलात्मक जाण असलेला वगैरे मानत होता.... पण गेल्याच आठवडयात आमचे एक मित्रवर्य पिऊ नये ते, पिऊ नये तितके, प्यायले आणि ह्याच कवी समोर... हा प्रकार एक तूफ़ान विनोदी किस्सा म्हणून सांगुन आडवे झाले.... त्यादिवसानंतर तो कविवर्य
"मी एक पाजी मनुष्य आहे आणि मला चेष्टा करण्याशिवाय काही येत नाही"
हे (कटुसत्य) सर्वाना सांगत सुटला आहे... वास्तविक पाहता मी त्याला काही खोटे बोललो नव्हतो... पण त्यानेमाझ्या comments चा साहित्यीक अर्थ घेतला होत.. चुक त्याची होती... जाऊ दे...त्याच्या नविन निर्मिती मलासहन नाही कराव्या लागणार हा एक फ़ायदा आहे.... ह्या एकाच कारणाने मी माझ्या मित्राला मोठ्या मनाने माफ़केले.... शेवटी प्रत्येक negative गोष्टीत पण काही तरी positive असतेच की....

पण कुणालाही दुखावायाचे नाही आणि कुणाच्याही प्रयात्नाना वाईट म्हणायचे नाही , हे तत्त्व मी लहानपणा पासूनमी follow करत आहे... (सरळ आहे .... आपण प्रयत्न पण करत नाही... मग जो करतो आहे त्याला कशाला नावेठेवा.... असा आपला साधा
सरळ विचार...) आणि काही वर्षांपूर्वी पर्यंत ह्या गोष्टीच विशेष त्रास पण होत नव्हता....
म्हणजे कोणी आलेच जवळ कविता/लेख घेउन... तर मी म्हणायचो
"
अरे... थोडा कामात आहे... ठेऊन जा.... मी वाचून सांगतो...."
मग थोड्या दिवसानी त्याने विचारले की...
"अरे... सॉरी सॉरी.... वे नाही झाला रे... थोडा वे देतोस का...."
असे जरा त्याला थाम्बवाले की मग अगदी विचार वगैरे केल्या सारखे दाखवून काही दिवसानी स्वत:हून त्यालापकडायचे आणि म्हणायचे....
"अहो मोठे लोक... आहात कुठे.... काय अप्रतिम लिहिले आहेस..... पण मला असे वाटते की तू अजुन तुझ्या क्षमतेला पूर्ण न्याय नाही देत आहेस..... (ह्याचा अर्थ मला आज पर्यंत नाही माहीत.... पण बोलायला आणि ऐकायला छान वाटते...) असेच लिहित रहा .... (पण माझ्या पासून दूर ठेव.... हे मनातल्या मनात....) मी तर म्हणेन अजुन चांगले लिहित जा (अस्सल पुणेरी टोमणा) पण एक सांगू का... माझ्या पेक्षा तू ह्या अमुक अमुक लोकाना का नाही दाखवत... त्याना जास्त जाण आहे ह्या गोष्टीत.. (मी एकट्याने का म्हणून torcher सहन करायचे.... हे पण मनातल्या मनात) इ.इ."

मग काय समोरचा गार होतो आणि आपल्याला गरम गरम चहा पाजतो... जास्तच मूड मधे असेल तर मस्त भजीकिंवा मिसळपाव पण... इकडे कष्टांचे चीज होते.... (अगदी शब्दशः...)
पण ब्लॉग ह्या पद्धतीने मात्र अगदी पंचाईत करून टाकली....
एका वेळी किती पण लोक वाचू शकतात... समोरच्याकडे एकच प्रत असण्याचे फायदे नष्ट होतात... आणि चांगल्या अभिप्रायाचे चीज पण नाही होत... सगळ्यात वाईट ते असते.... आता ब्लॉग चा हयात काही दोष नाहिये तसे पाहिले तर.... चांगल्या कामासाठीवापरता येतेच की... पण चांगला वापर करेल तो मनुष्य कसा.... (मी पण त्यातच येतो... खोटे का बोला)

हे स्वघोषित (नव-ब्लॉग) लेखक... स्वत:ला मारे थोर कवी/लेखक समजतात...प्रस्तावना कशी असते.... कंसातिलवाक्ये माझे मनोगत... अर्थात मनातल्या मनात....
"मी काही कवी/लेखक नव्हे... (अरे माहीत आहे ना तुला पण... मग का लिहितो... वीज का वाया घालवतो... इथे खेडोपाडी १६-१६ तास भार नियमन होते.... वीज निर्मितीसाठी प्रदुषण होते... त्यामुले global warming वाढते... तूच जबाबदार आहेस ह्या सर्व परिस्थितीला... कण्ट्रोल प्रसाद कण्ट्रोल.... अजुन १च ओळ झाली आहे.... मुख्य युद्ध अजुन दूर आहे ) मी पेशाने एक अमुक अमुक अमुक... (अरे जे आहेस ते धडपणे कर की..... कशाला दुसर्यागोष्टीत नाक खुपसतो.... जे आहे त्यात इंटेरेस्ट नाही.... मग फिल्ड बदल... पण माणसाचे असेच असते) ..... पण आयुष्यात अनेक विलक्षण अनुभव घेता घेता मन खिन्न झाले ( ह्या लोकांचे विलक्षण अनुभव म्हणजे.... कधी तरी सर्व मुलांनी common off घेतला तेव्हा ह्यानी मोठा धीर करून सरांची परवानगी काढायची हिम्मत केलीआणि सरानी ह्याना झापला... किंवा... एखादी मुलगी आवडली म्हणून तिच्या मित्राला (आपल्या ग्रुप मधे, त्याच्यासमोर नाही ) जोरदार शिव्या घातल्या.... इ.इ..)..... आणि मग अश्या ह्या अवस्थेत विचारांच्या डोहात सफ़र करता करता "सहजच काही सुचले म्हणून "

आता अश्या ब्लॉगचे नाव काहीही असू शकते... खिन्न अवस्था कधी कधीप्रसन्न अवस्था असू शकते... नाव सुद्धा बदलू शकते...
माझ्या मनाचा आरसा, मनातील विचार, विचार डोहातील काही भोवरे.....
ह्या पैकी काहीही..... थोड्या फार फरकाने असाच काहीसा अर्थ असतो...

कविता करताना आपण अगदी थोर कवी असल्या सारखे जीवन विषयक तत्वे मांडतात.... प्रसिद्ध कवींच्याकवितान्माधुन ओळी मधून उचलतात आणि उगीचच हे असेल वागणे मला मंजूर नाही सांगत सुटतात.... मी कसा स्वच्छंदी आहे , मनस्वी आहे सांगत सुटतात... अरे स्वच्छंदी असातर ते तुमच्या वागान्यातुन, लिहिन्यातुन दिसले पाहिजे.... एक साधा चहा करताना तुम्ही १०० जणान्ना विचारता ... चव बिघडली तर कोण काय म्हणेल ह्या विचारात असता आणि आव आणता स्वच्छंदीपणाचा... खर बोलायच तर स्वच्छंदी नसलेल्या लोकानाच असे ओरडत सांगावे लागते मी स्वच्छंदी आहे , मी मनस्वी आहे... जे खरे स्वच्छंदी कलावंत असतात त्यांच्या स्वच्छंदी पणाचा कुणाला त्रास होत नाही... पण ह्या लोकांचा जो स्वच्छंदी वागण्याच्या आव असतो तो म्हणजे.... अरे मी कुणाचा पण अपमान करीन... मी फार भारी आहे... असा असतो..... हा असला ओढून ताणून आणलेला स्वच्छंदीपणा एखाद्या वारानिशी गलून पडतो.... आणि हे लोक लगेच defensive mode मधे जातात.....अश्या वेळी ह्यांचा राग येता कीव येते.... लोकाना वाटेल मी हे चिडून लिहित आहे... पण ज्याचे जलते त्यालाच कलते... कायत्रास होतो अश्या लोकांचा... नाही कळणार..... हे अनुभवल्या शिवाय नाही णार.... पण जाऊ दे... असे अनुभवन आलेलेच बरे.... आहात तसेच सुखी आहात....
पण पुढचा लेख वाचताना कीव परत संतापाला जागा करून देते.....
कुठे तरी वाचलेले असते की हा थोर कवी आधी सरकारी कचेरी मधे होता... मग लगेच ह्यांचे ऑफिस ह्याना तसे वाटू लागते..... ह्यांच्या प्रतिभेला वाव मिळत नाही असे वाटू लागते.... लगेच कागद घेतात (काल एडिटर उघडतात comp वर) आणि लिहायला सुरुवात करतात.... कुठे "आले" ला "गेले" ... "समजे" ला "उमजे" असेल यमक जुळवत बसतात...नाही तर उगीच "हे जीवन मिथ्या आहे..." किंवा "आजच्या समाजात खर्या कलावान्ताला मान नाही...." इ.इ.खरबसतात...
एका कविचे उदा.
मी आज उत्तम शिक्रण केले, ते खाऊन आमचे मांजर देवाघरी गेले....

अरे काय अर्थ, का काय आहे कवितेला.... पण नाही... यमक आले ना... मग झाले...

माझा एक मित्र आहे.... एक प्रसिद्द हिंदी/उर्दू कवी त्याचे प्रेरणास्थान आहेत..... सर्व ठिकाणी लिहित असतो की मी ह्याच्या पासून स्फूर्ति घेतली... ते हिंदी मधे करतात (करायचे... गेले बिचारे.... खर तर सुटले.... ह्याच्या कविता ऐकल्या असत्या आणि कळले असते की हेत्याचे स्फूर्तिस्थान आहेत... तर धक्क्याने गेले असते) म्हणून मग हा पण हिंदी कविता करतो... खर तर ह्याचे हिंदी म्हणजे ...
"वो चहा कप में ओतते ओतते मेरे हात पे सांडा और मेरा हात बहुत भाजा....."
स्टाइल..... पण एकदा स्फूर्ति स्थान ठरवले की मगणार नाही .... मग हिंदी वर्त्तमानपत्रामधून नाही तर त्याच कविच्या कवितान्माधुन "चलो" ला "मिलो" , "सुन" ला "बुन", "डरो" ला "भरो" असे काही तरी जुळवत बसतो.... आता नाही म्हटले तरी त्याला चार लोक ओळखतात कवी म्हणून.... त्याची आई, त्याचे वडिल, मी आणि माझा एक समदु:खी मित्र.... झाले की चार लोक.... पण हा भिडू दिवासेंदिवास सुटतच चालला आहे.... री मधे असताना त्याने केलेल्या कवितेचे वर्गात कौतुक झाले होते... ते अजुन मनात धरून आहे... म्हणतो....

"ते गुरूजी गेले रे... त्याना खरे कौतुक होते माझ्या कलेचे... आज काल असे लोक कमी झाले आहेत रे... कलेची जाण असणारे... ७ वी पासून मी नियमितपणे कविता करू लागलो... त्याना दाखवायचो मी... पण मी ८ वी मधे असताना अचानक मनावर परिणाम झाला रे त्यांच्या... संतुलन घालवून बसले... काय माहित कशाने ????" वर हा प्रश्न....

अजुन एक मित्र आमचा... कोणीतरी प्रेयसी आहे ह्याची काल्पनिक... तिला उद्देशून कविता चालु असतात... माझ्या सखे... अशी सुरुवात... च्यायला जो माणूस प्रत्येक गोष्टीत जीवनविषयक तत्वद्न्यान शोधतो त्याला कोण सहन करू शकेल.... एकदा एका कुत्र्याशी त्याचा मालक ball ने खेळत होता.... आम्ही मस्त चहा पीत होतो..... ह्या महाराजांचे सुरु शुन्यात बघून ...
" माणसाने आज माणसालाच गुलाम करून टाकले आहे.....अगदी ह्या कुत्र्यासारखे....कोणी तरी कोणाच्या गळ्यात पट्टा बांधायचा आणि खेळवायाचे २ घटका.... पण त्या क्षणी ही अद्न्यान माणसे विसरतात.... की ते पण तर नियतीच्या हातातील कुत्रेच आहेत... आत्ता नियती पण त्यांच्याशी खेळत आहे.... पट्टा ढीला आहे आत्ता... पण जेव्हा नियती हाच पट्टा करकचेल तेव्हा तुम्हाला तो फास वाटेल... "

मस्त शनिवार सकाळ होती (फ़क्त ११.४५ झाले होते) ... बुवांचा "पेशल चा" होता.... पण हे ऐकून तो पण घश्याखाली (नरडयाखाली जास्त योग्य राहील) उतरेना.... शेवटी पैसे देऊन निघू लागलो तर तो टपरीवाला पप्या आम्हाला विचारत होता हळूच... काल जास्त झाली का.... नेहेमीचा टपरीवाला तो... त्याला मग जवळ जाउन समजावले... ज़रा सटकलेली केस आहे..... तर टपरिवाले बुवा म्हणे....
"शनिवारचा उपास करायला लावा... बघा नीट होइल की नाही...."
अश्या मुलाला कशी एखादी मुलगी हो म्हणेल....
हाच हीरो एकदा जंगलात गेला होता.... चांगले असते ... कधी कधी चेंज म्हणून चांगले असते... तेवढीच शांतता लाभते मनाला... मित्रांच्या... परत येऊन साहेब सुरु...
"अरे तिकडे एक माकड पाहिले.... मस्त उड्या मारत होते.... स्वछन्द... कुणाचे भय नाही... टेंशन नाही.... अगदी मुक्तपणे खेळत होते..."
आमचा एक फिरकी घेणारा मित्र लगेच त्याला मधे तोडत ...
"
तू जसा शब्दांमधे संचार करतोस तसे..... मित्रा... तू पण तर माकड नव्हे का शब्दांच्या दुनिये मधला...."
महाराज विनोद वगैरेच्या पलिकडे गेले होते...
"
हो हो... माकड म्हणा हवे तर... शेवटी हनुमान पण तर माकडच होते... आपले पूर्वज पण माकदाच होते....."
सरकार थाम्बतनव्हते.... शेवटी २० मिनिटे माकड पुराण आणि माकड अणि सरकार (शब्दांच्या दुनियेत) हयात जास्त उड्या कोण मारतो ह्या प्रश्नाचे उत्तर "सरकार " असे आल्यावर स्वारी थांबली.... नंतर त्याने एक कविताऐकवली... त्याच काल्पनिक प्रेयसीला उद्देशून....
"सखे... तू अशी माझ्या समोर येतेस.... मी तुला काही बोलताच.... मन्दसे हसून निघून जातेस..... कधी मिश्किल हसतेस... कधी छद्मी हसतेस.... हसता हसता माझ्या हृदयावर किती वार करतेस... एकदा चिडून गालावर फटका मारला होतास तू... नंतर माझा विचार करून खिन्न झाली होतीस तू.... पण हे तुला नाही लक्षांत आले... तुझ्या स्पर्शाने पण सुखावलो होतो मी..."
ही कविता ऐकवली होती...
त्याच्या ह्या अनमोल विचारांनंतर त्याला जबरदस्तीने सगळे आता शनिवारचा उपवास करायला लावतात.... अजुन त्याच्या कविता तर नाही सुधारल्या... पण आम्हाला शनिवारी त्याच्याकडून खिचडी, शिक्रण आणि कुठलीही एक मिठाई (generally पेढे) असते.... so...मारुतीरायाच्या कृपेने आता त्रास खुपच सुसह्य झाला आहे....
तर असा हा सर्व त्रास आहे... कधी तरी मी काही साहित्यीक शब्द बोलुन गेलो आहे....आणि एका (स्वघोषित) कविच्या उपमा दूसरी कडे वापरल्या आहेत.... (बाकी उपमा मला खायला जास्त आवडतो... देण्यापेक्षा... पुण्याची खासियत... कुणाला काही देण्यापेक्षा खाणे बरे....) शेवटी पापे इकडेच फेडावी लागतात हेच खरे... आता माझे मित्र काहीही लिहिले तरी मला देतात.... आता हेच लिहिता लिहिता links आल्या आहेत ....
१.आठवणीची दुनिया
२.एक कोमेजलेली संध्याकाळ (वेळ पण कोमेजाते????? माझा विचार )
३.मी का लिहितो....??? - एक आत्मचिंतन (हा प्रश्न नसून मी लिहिणे समाजाला कसे हितकारक आहे ह्यावर एक प्रबंध असणार ह्या वर मी पैज लावायला तयार आहे...)

वरील ही लेखक हे चांगले engg आहेत... पण ऑफिस मधे सध्या कुणालाच काम नाही... मग keyboard वर बोटे मारल्याचा आवाज आणायला म्हणून लिहितात (यूरेका... ३र्या प्रश्नाचे खरे उत्तर सापडले ) आणि मग गेल्या जन्मिच्या ह्या क्रन्तिकारकाना मी इंग्रज बनून जे पिडले होते त्याचा बदला घेतात.... त्यांच्या भाषेत ते ह्या जन्मी पण क्रांतिकारकआहेत... पण अहो... मी आता इंग्रज नाही त्याचे काय?????

चला प्रतिक्रिया लिहू आधी... लेख निवांत वाचू.... असाही... सौर्स कोड नंतर अल्गोरिथम लिहिणारे लोक आम्ही... इथे तरी का ती प्रथा सोडू... :)
पहिल्या लेखाची प्रतिक्रिया...

"तुझी स्मरणशक्ती म्हणजे कमाल आहे..... भावा,
नादखुळा आहेस... (लेखक कोल्हापूरचा आहे... लेखकाचे गाव लक्षात ठेवावे... म्हणजे त्याला पहिल्या वाक्यात गार करता येते... आणि मग गरम चहा गैस वर चढतो... इथे त्याला पुणेरी टोमणा समजणार नाही ... खुळा हा शब्द येथे पुणेरी अर्थाने आहे), कुठल्या कुठल्या गोष्टी तुला लक्षात आहेत.... (येथे एक अदृश्य ? आहे... कारण मला खरच माहीत नाही) काय धमाल केली होतीस तू... आपले किस्से लक्षात आहेत ऩा??? नाही मोठी माणसे तुम्ही... सर्व किस्से नाही लिहिले आपले... (आता बसेल २ दिवस आठवत... मग आठवेल... आम्ही काहीच किस्से नाही केले... हेहेहे ... गनिमी कावा म्हणतात याला पण )

दुसर्या लेखाची प्रतिक्रिया :

"मन खिन्न झाले वाचून... तू एवढा गहिरा विचार (साहित्यीक शब्द, उधार घेतला आहे काल्पनिक प्रेयसीच्या खर्या प्रियाकराकडून, पुणेरी लेखकाला असे शब्द उत्तरामधे ऐकवावे लागतात ) करतोस माहीत नव्हते रे...खरेतर तू एवढा गहिरा विचार करू शकशील असे वाटले पण नव्हते... शब्द्सागरात गोते मारून मोती वेचून घेऊन आला आहेस मित्रा .... पण तुझ्या क्षमतेला पूर्ण न्याय नाही देत आहेस तू.... अजुन बराच सुधारू शकतोस...(स्पेशल पुणेरी)..."

तिसर्या लेखाची प्रतिक्रिया ..
"सुरेख.... शब्दच सुचत नाहीयेत... तू स्वत:ला हौशी लेखक म्हणवतोस हा तुझा नम्रपणा आहे (वास्तविक पाहता तू लेखक पण नाहीस रे बाबा....)... कोणी मस्करी केली तुझ्या १-२ लेखांची तर एवढा नाउमेद का होतोस... (माझी मस्करी ह्याच्या पर्यंत नाही पोहोचली हे लेखावरून स्पष्ट आहे... नाहीतर मला आला नसता... सुटलो असतो मी...) मान्य की अजुन तू seriously बघत नाहीस लेखनाकडे....केवळ विरंगु
ळा म्हणून लिहितोस... पण त्यात पण केवढा मतितार्थ असतो... (उधार परत) .... तू लेखन बंद केलेस तर... छे छे कल्पना पण नको करूस.... बाकी मी काय प्रतिक्रिया देणार... मला फार काही कळत नाही... पण तू लिहितोस ते मला भावते....(उधारी बास आता ).... चांगला मित्र आहेस.... (लेखक नाहीयेस चांगला तो भाग वेगळा) .... तुझ्या विषयी वाटते म्हणून सांगतो (आणि स्वत:विषयी पण)... बाकी तुला मी काय समजावणार...

एवढे सगळे करूनही लिहिणारे लेख लिहित जातात.... आणि मी आपला प्रतिक्रिया लिहित जातो.... कधीतरी वाटते... एकदा सरळ सांगावे की बाबानो खुप वाईट लिहिता ... बास करा आता..... पण नंतर त्यांच्या लेखांचे उपकार पण आठवतात... आज पर्यंत कधीही विनोद मारायला असेच तर लोक कामी आले आहेत.... त्यांचे ते उपकार स्मरून मी गप्पा बसतो आणि त्यांचा चेव वाढतच जातो.....

ता.क.खर्या साहितिकांविषयी लेखकाला नितान्त आदर आहे..... येथे कोणाचीही चेष्टा करण्याचा उद्देश नाही... सर्व घटना व पात्रे काल्पनिक आहेत...... काही साधर्म्य सापडल्यास योगायोग समजावा.... काही गोष्टी आवडल्या नाहीत तर मनावर घेऊ नये(एक पुणेरी सल्ला).... उपरोधात्मक दृष्टिकोन बाळगणे फायदेशीर ठरेल....





लेखक : गुरुप्रसाद आफळे

Friday, December 12, 2008

मंगलाष्टके

लग्नसोहळा म्हणजे एक "भारी" प्रकार असतो ........ त्यातील प्रत्येक कार्यक्रम अतिशय मजेशीर बनू शकतो... प्रत्येकावर स्वतंत्र ग्रंथ लिहिता येइल अगदी.... (काही जणांना कंटाळवाणे वाटु शकतात... मी पण त्यातलाचआहे..... ) शक्यतोवर मी सर्व कार्यक्रम टाळुन मुख्य कार्यक्रमाला हजेरी लावतो... जेवण ( ते ही आधी मेनू कळला तर जास्त उत्साहाने किंवा उत्साहाच्या अभावाने....) पण एक कार्यक्रम मात्र कधीच चुकवता येत नाही..... तो म्हणजे मंगलाष्टकांचा आणि अर्थातच अक्षता टाकायचा .... कारण त्याला नाही आणि जेवणाला आहे असे करणेबरे नाही वाटत ....
आणि परत लग्नात अनेक माणसे अनेक वर्षांनी भेटतात..... म्हणजे अगदी १०-१५ वर्षानी सुद्धा... त्यानी आपल्याला ज्या वेळी पाहीलेले असते तेव्हा आपण अगदी लहान असतो... म्हणजे - वर्षांचे... आणि ते तेव्हा चांगलेच मोठे असतात... कमीत कमी १५-१६ ते जास्तीत जास्त कितीही.... मग आपण १५-१६ वर्षांपूर्वी किती लहान होतो (आता असणारच... २२ वर्षांचा मुलगा १५-१६ वर्षांपूर्वी लहानच असणार.... पण ते ऐकवूनदाखवतात...) आणि आपण तेव्हा कसे वेड्यासारखे वागलो होतो हे सर्व ऐकवतात... आपल्याला कमी आणि आजूबाजूच्या लोकांना जास्त...... म्हणुनच मी सहसा असे प्रसंग टाळतो.... (उगीच लोकाना का कळु द्या लहानपणीमी दंगा केला आहे ते... आणि तसे सगळेच करतातच की....) पण कधी कधी अगदीच नाईलाज होतो आणि जावे लागते.... अशा वेळी पण मी तसा गर्दी पासून लांब एकटा राहतो... जाणो कुणी एकदम ओळख दाखवून अचानक लहानपणीच्या गोष्टी सांगायला सुरुवात केली म्हणजे...
पण कधी कधी तेहि आपण कसे तरी सहन करतो... पण जर कुणी तालासुरात आणि स्वरचीत म्हणु लागले मंगलाष्टके की मग झोप अनावर होते.... आणि जर अर्थ danger असेल तर मग विचारायलाच नको...


परवा असाच एक प्रकार झाला... एका फार लांबच्या भावाच्या लग्नाला जावे लागले... (कारण मला कार्यालयाचा पत्ता माहीत होता.... पाहुण्यांना पत्ता माहीत नव्हता ) ३० मिनिट पुण्यामधे गाड़ी चालवून अगदी थकून गेलो होतो...उशिरा गेलो होतो......बाकी सर्व विधी झाले होते ....
मी आपला कोणी ओळखीचे दिसते का म्हणुन शोधत होतो...तेवढ्यात बाजुनी आवाज ऐकू आला .....

"अरे कोण प्रसाद ?? ये ये ...."
मी चमकून बघितले...... तर समोर काका उभे... जाउन भेटलो काकांना.... कसे आहात वगैरे विचारणा झाली... त्यानी बाजुच्या एक "माणसाला" बोलावले....

काका
: ओळखलेस का ह्याला ??
मी : हेहे ... चेहरा ओळखीचा वाटतोय... नाव नाही लक्षात येत आहे... ( मला चेहरापण आठवत नव्हता... पण उगाच वेळ मारून न्ह्यायचा प्रयत्न)
काका : अरे हा तुझा दादा..... (त्यानी काही तरी नाव सांगितले).... अरे तुझी आत्येबहिण आहे ना... तिच्या चुलतभावाचा सख्खा मावस भाऊ... ( बापरे... मी नाते पाठ करून ठेवले... परत विचारले तर काय घ्या....)
(मला खरोखर लक्षात आले नव्हते.... पण आता अशा ठिकाणी जास्त विचार करायला वेळ नसतो... म्हणुन मग सुरुवात केली )
मी : अरे हा हा .... बरोबर... अरे दादा कसा आहेस???? किती वर्षानी भेटत आहे आपण??? (मनातल्या मनात ... बहुतेक पहिल्यांदाच...)
दादा : मजेत आहे रे.... तू कसा आहेस??? काय करतोस??? केवढा मोठा झाला आहेस..... मागे ताईच्या लग्नात भेटलो होतो... - वर्षांचा होतास तू.....
मी : हा हा .... म्हणुनच मला नाव लक्षात येत नव्हते... (च्यायला इथे काल काय जेवलो लक्षात नाही रहात... हा गडी १७ वर्षांपूर्वीची आठवण काढतो आहे ... - वर्षांचे असताना आपण काय केले हे फ़क्त "आत्मचरित्र" लिहिणार्या लोकांना आठवते... "नॉर्मल" सामान्य लोकांना नाही...)
दादा : काय गोंधळ घातला होतास तू....किती त्रास द्यायचास सर्वाना.....

(इथे काही "जुन्या, दुर्मिळ" आठवणी समोर आल्या ... त्या आठवणी गुप्त असण्यातच ( लेखकाचे) जग सुखीराहील..... अप्रकाशित आठवणी ऐकण्यासाठी प्रत्यक्ष संपर्क साधावा...)

मी
: (उगीचच हसून).... अरे आता मला नाही आठवत... (मनातल्या मनात..... कोणाला माहीत खरे सांगतोय का फेकतोय... )

आता
हा दादा माझ्या पेक्षा १२-१३ वर्षानी मोठा..त्यामुळे ह्याने - वर्षाचा असताना ह्याने काय केले मला कसे माहीत असणार... म्हणुन मग गैरफायदा घेत होता तो...
त्याची मुलगी गोंधळ घालत होती... कोणीतरी येउन म्हणाले.......

"बघ अगदी तुझ्यावर गेली आहे... तू पण असाच होतास.... आठवते ना... किती छळायचास आम्हाला.... आता तुझी मुलगी बघ...."

हे
ऐकून अचानक तो निघून गेला... बहुतेक माझ्या चहर्यावारिल भाव आणि मनातील प्रश्न - काय केले होतेस तू- वर्षाचा असताना??? त्याला कळला असावा....... उगीच बाका प्रसंग नको म्हणुन पळुन गेला....

मंडपात
येताना हातात एक कागद दिला गेला होता ... कुठली जाहिरात असते तसा होता... मी फेकून देणारहोतो...पण म्हटल राहू दे... निवांत वाचू... तेवढ्यात वरती नजर गेली... मथळा होता

"
मंगलाष्टके
चि . सौ . का . XXXX च्या विवाहात सौ . xxxxx आणि सौ . xxxx कडून सप्रेम भेट
कवयित्री : (इकडे पहिल्या xxxx चे नाव..)
चाल आणि संगीत : (इकडे दुसर्या xxxx चे नाव)
"

जरा
नजर फिरवली आणि भावी संकटाची चिन्हे स्पष्ट दिसू लागली.... ती अक्षरशः "अष्टके " होती...
प्रत्येक ओळीत शब्द च्या पटित .... प्रत्येक कडव्यात ओळी च्या पटित.... फ़क्त शद्बा मधील अक्षरे आणि कड़वी च्या पटित नव्हते ... कड़वी होती .... पहिले आणि शेवटचे अशी कड़वी गुरूजी म्हणणार होते.... मला अचानक गुरुजींचा आधार वाटु लागला...

तेवढ्यात
गुरुजींचा ठेवणितील आवाज ऐकू आला.... आणि मंगलाष्टके सुरु झाली ... पहिले मंगलाष्टक कुठले तरीटिपिकल होते.... त्या नंतर मात्र "श्लोक" सुरु झाले... त्या श्लोकांचा अर्थ खरोखरच दणदणीत होता....
आता श्लोक तर काही लक्षात नाहित... पण दणदणीतपणा मुळे अर्थ असा मनावर "उमटला" गेला (emboss)
श्लोक काहीसे असे होते

श्लोक
: इकडे मुलीच्या माहेरचे तुफ़ान कौतुक केले होते.... म्हणजे अगदी सर्वगुण संपन्न (आणि त्यासाठी उगीचच सासरचे वर्णन टिपिकल वाईट केले होते...)
मुली, तू सासरी निघाली आहेस... तुला माहेरी अगदी लाडात वाढवले आहे... कसलीही कमी पडून दिली नाही..... पण सासरी असे असेलच असे नाही.... आई बाबा तुला कधी रागावले नाहित... पण सासू तुला कटु बोल ऐकवेल... (इकडे मुलीची सासू... तिचा चेहरा पडला... तिने स्वतःच्या मुलाला तर सोडाच... पण कामावाल्यानाही कधी "कटु" बोल ऐकवले नव्हते... आणि डायरेक्ट लग्न मंडपात असे काही ऐकवले गेले....) पण तू सुद्न्य आहेस .... कधी मर्यादा ओलांडू नकोस... शब्दाला शब्द वाढवू नकोस... तुझे आई-बाबा आदर्श आहेत... तू पण तशीच वाग... उपदेशांचे डोस पाजले होते... (१६ ओळी)

श्लोक
संपत कसा नाही असा विचार करत होतो... इतक्यात शुभमंगल सावधान असे ऐकू आले... काही यमक वगैरे काही नाही... डायरेक्ट उपदेश झाला की सावधान...

श्लोक
: इकडे सासरची देवमाणसे आणि त्यांचे कौतुक... पण इकडे माहेरच्यांचे काही नाही.... (कवत्रियीमुलिकडची होती... माझ्या मनात परत विचार) मुली, तुझे सासू सासरे देव माणूस आहेत... मुलाच्या मोठ्या बहिणीचे लग्न झाले आहे.... त्यामुळे आता तू त्याना मुली सारखी आहेस... (म्हणजे जर लहान बहिण असती तर ही मुलीसारखी नसती का झाली ... माझी अजुन एक शंका) मुलाचे आजी आजोबा पण खुप चांगले आहेत.... सगळ्याना मान दे ... तूझे नशीब थोर म्हणुन तुला असे सासर मिळाले... ( ओळी)

(मागचा श्लोक आणि ह्याचा कुठे तरी संबंध लागतो का हे पाहण्यासाठी मी ते पान वाचू लागलो.... पण माझे प्रयत्नव्यर्थ गेले.... काहीच संबंध नाही.... मला वाटले... मुलाकडच्या कुणीतरी हा श्लोक लिहिला असेल... पण तसे काही नव्हते... शेवटी मी प्रयत्न करणे सोडले....)

परत शुभ मंगल सावधान.....

श्लोक
: इकडे माहेरच्या लोकांचे नावासाहित कौतुक... म्हणजे काका, काकू, मामा, मामी, मावशी, आत्या .च्या नावासाहित... प्रत्येकाचे नाव गुंफले होते... शेवटी तर कवयित्रीचे सुद्धा नाव होते.... जणू काही पुराणकाळातील स्तोत्र आहे... "xxxx ने रचिले हे स्तोत्र xxxxx देवाचे " त्या तालावर ...
"xxxxx ने रचिले हे मंगलाष्टक (की षटक माझी परत शंका), संगीत दिले xxxxx ने आणि गाई (गायन करी ह्याअर्थाने) xxxxx" (परत १६ ओळी)
म्हणजे कवयित्री चे नाव दा (कारण तीच म्हणत होती) चीटिंग आहे अजुन एक विचार माझ्या मनात ...
शुभ मंगल सावधान.....

श्लोक
: (श्लोक क्रमांक प्रमाणे , पण कौतुक सासराच्यांचे) हा श्लोक अगदी मोजुन ओळीन्मधे संपला ... जास्त काही सुचले नसावे... माहेराचा श्लोक १६ ओळीन्चा होता... आणि हयात अगदी औपचारिक कौतुक होते... नाव कुणाचे नव्हते... फ़क्त लोक चांगले आहेत... संस्कार चांगले आहेत... प्रेमळ माणसे आहेत... ..... म्हणजे विशेष काही नव्हते कौतुकामधे... समोरच्याला ओळख करून द्यावी असे..... ( ओळी)
शुभ मंगल सावधान.....

श्लोक
: इकडे मुलीला कसा आदर्श नवरा मिळाला आहे.... ह्याचे वर्णन... (आता मुलगा आणि मुलगी एकमेकाला वर्ष ओळखत होते.. प्रेमविवाह होता.... तिला नविन काय सांगणार ही कवयित्री....) पण श्लोक ऐकताना वाटले की मुलगापण पहिल्यांदा एवढे कौतुक ऐकत असेल स्वतःचे.... मुलगा अतिशय विनम्र आहे... शांत आहे.... सज्जन आहे... गुणी आहे..... हुशार आहे.... .... (म्हणजे जणू काही लग्न ठरवत आहे... कुणीतरी सांगा तिला जाउन लग्न चालु आहे , ठरवायचे नाही माझे मौलिक मत....) मुलगा आई वडिलांचा( मुलीच्या) मान ठेवेल... मुलीला सुखात ठेवेल... मुलीने आदर्श वागले पाहिजे... ...... ( ओळी)
शुभ मंगल सावधान...

(रामदास स्वामी "शुभ मंगल सावधान" ऐकल्यावर का पळाले हे मला आत्ता कळले.... तेव्हाही अशीच कुणी कवयित्री असणार ... आणि तेव्हा तर लोकांना जेवण करून दुपारी ऑफिस गाठायची घाई पण नसणार .... मग मोठमोठे श्लोक झाले असणार....पहिला श्लोकच एवढा लांबला असेल की सहनशक्ति संपून त्यानी धूम ठोकली असेल मन्डपातुन .... मुलाच्या मनातही असे काही विचार सुरु असल्याची चिन्हे दिसू लागली होती..... चक्क जांभई दिली मुलाने आणि मुलीने सुद्धा )

( गायिकेच्या चेहर्यावर साक्षात परमानंद, इतरांच्या चेहर्यावर सुटत आलो एकदाचे हे भाव स्पष्ट .... गुरूजी आणि त्यांचे मदतनीस अंतरपाट धरून कन्टाळले होते... अंतरपाट एका साइडने कलला होता आणि मुलाला मुलगी आणि मुलीला मुलगा स्पष्ट दिसत होते.....)

श्लोक
: (कड़वी कमी पडत असल्याने हयात भाग होते)
भाग : इकडे मुलाला किती चांगली मुलगी बायको म्हणुन मिळाली आहे ह्याचे कौतुक .... सन्दर्भ थोड़े वेगळे ...
पहिले काही मुद्दे सारखे होते... उदा. गुणी, शांत, विनम्र ...... मग पुढे टिपिकल मुलीचे गुण.... सुंदर आहे...सालसआहे...मुलाच्या नावाला शोभेल असे मुलीचे नाव ठेवणार होते (म्हणजे मुलाच्या नावाला जोडून) लग्नानंतर... त्यावरून कौतुक की किती चांगला जोड़ा( couple, दुसरा अर्थ घेऊ नये) आहे .... लक्ष्मीनारायणाला लाजवेल असा ..... (१२ ओळी....)
भाग : सर्व लोकांचे आभार मानले गेले... (आभार प्रदर्शनाची संधि नाही सोडली.... इति मी)... सर्व लोक विनंतीला आणि आग्रहाला मान देऊन आले.... शुभचिंतक आले... आशीर्वाद दिले त्या साठी त्यांचे आभार .......... (ओळी)
शुभ मंगल सावधान....

परत
गुरुजींचा ठेवणितला आवाज ऐकू आला.... अगदी हायसे वाटले सर्वानाच... अगदी नवर्या मुला-मुलीला सुद्धा लगेच सर्व विधि संपले १० मिनिटात... म्हणजे मंगलाष्टक २३ मिनिटे आणि उरलेले १० मिनिटे... परत आभारप्रदर्शन आणि भोजन बागेत सुरु झाल्याची घोषणा (परत कवयित्री कम गायिका) दोन्ही झाले ....हयात सुद्धा जरासाहित्यिकपणा आणला गेला.... मी पण "आभार" मानून लगेच तिकडे भोजनासाठी पळालो...

(समाप्त)

लेखक : गुरुप्रसाद आफळे